माझ्या आयुष्यातील आजवरच्या कडू-गोड आठवणी मी "पूर्वानुभव" म्हणून सादर करत आहे.
आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!

१४ जानेवारी, २०१२

शब्दावाचून कळले सारे......

कविवर्य मंगेश पाडगांवकरांचं गीत,पुलंचं संगीत आणि पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी गायलेले हे गीत माझ्या आवडत्या गीतांमधलं एक आहे....संजय देशपांडे ह्यांनी हेच गीत सतारीवर वाजवलंय....त्यांनीही अतिशय छान वाजवलंय ते...मूळ चाल न बदलता तरीही स्वत:चं असं काही तरी...त्यामुळे ते डोक्यात चटकन बसत नव्हतं...आमचं काय हो...आम्ही अभिषेकीबुवांनी जसं गायलंय तसंच गाण्याचा प्रयत्न करत असतो...त्यामुळे डोक्यात तेच सूर,त्याच जागा दिसत असतात...त्यामुळे ह्या सतारीवर वाजवलेल्या गीताचा रूळ बनवून गाण्याचा माझा प्रयत्न म्हणावा तेवढा यशस्वी होत नव्हता...त्यातून ते ठाय लयीत होतं...मग काय थोडी लय वाढवली आणि केला प्रयत्न....डोक्यात अभिषेकी आणि प्रत्यक्ष सतारीबरोबर...म्हटलं तर अगदी साधंच गायचंय...तेव्हा थोडाफार गोंधळ नक्कीच उडालाय..तरी आवडेल आपल्याला हा प्रयत्न असं वाटतंय...ऐका आणि आपणच ठरवा काय ते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: